उन्हाळ्याचे दिवस होते सूर्य आगीच्या ज्वाला सोडत होता,, मुलांच्या शाळांना सुट्ट्या लागल्या सुट्ट्या म्हटलं की मुलांचा आनंद गगनात मावेनासा झाला, प्रकाश त्याची भावंडे आणि त्याचे गावातील इतर मित्र मैत्रिणी यांची टोळी, खूप उत्साही होऊन खेळण्यासाठी तयार झाली, दहा-बारा जण होते त्यांच्या टोळीमध्ये कधी लपंडाव ,कधी क्रिकेट ,तर कधी चिंपोळ्या कधी सुर पारंब्या कधी कधी सुरुपाट, असे अनेक खेळ ते सगळे मिळून खेळत यामध्ये त्यांना आपला दिवस कसा गेलेला हे कळतच नसे, कधी पोहायला जाणे, एकत्र मिळून जेवणाची छोटीशी पार्टी करणे, असे जणू त्यांचे बालपण हे सोनेरी अक्षरानेच लिहीत होते, कधी कधी तर ही मुले रानमेवा गोळा करण्यासाठी बाहेर पडत यामध्ये ती चिंचा बोरे जांभूळ आणि कधी आंब्याच्या कैऱ्या पिकलेल्या आंबे, गोळा करण्यासाठी रानोमाळ फिरत त्याची असणारी चव ही पंचपक्वानाला सुद्धा वरचढ होती, ही मुले जणू रानपाखरच होऊन त्या रानोमळ फिरत होती मस्त आपल्या आवडी जपत एक समाधानाचा आयुष्य जगत होती, एकत्र मिळून गप्पा मारणे, जोक करणे आणि संध्याकाळच्या वेळी एकत्र मिळून अंताक्षरीचा खेळ खेळणे, तसेच मिळून कधी संध्याकाळच्य...